Ticker

6/recent/ticker-posts

लॉकडाऊनमुळे तीन महिन्यांचे लाईटबिल शासनाने माफ करावे - तेजराव वानखडे


लॉकडाऊनमुळे तीन महिन्यांचे लाईटबिल शासनाने माफ करावे - तेजराव वानखडे
वाशिम - लोकडाऊनमुळे सर्व गरिबांचे तीन महिन्यांचे लाईटबील शासनाने माफ करावे; सर्व बिल माफ करता येत नसेल तर किमान 50 टक्के वीजबिलाची रक्कम माफ करावी अशी मागणी लोकनेते, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीचा शासनाने विचार करुन महाराष्ट्रातील सर्व गोरगरीब जनतेचे तीन महिन्याचे विजबिल माफ करुन त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष तेजराव वानखडे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केली आहे.
    या पत्रकात वानखडे यांनी नमूद केले आहे की, 50 टक्के वीजबिल माफ करण्यासाठी त्यातील अर्धी वीज बिलाची रक्कम म्हणजे 25 टक्के बिल वीज कंपनी ने माफ करावे तसेच पुढील 4 महिने  थकबाकीमुळे कोणाचाही विजमिटर कापू नये अशी सूचना ना. रामदास आठवले यांनी विजकंपन्यांना केली आहे. मुंबई उपनगर येथे अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनी ने 18 टक्के वीजबिल माफ केले आहे. मात्र आणखी वीजबिल माफ करण्याचे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केली आहे. मुंबई शहरात वीज पुरवठा बेस्ट करीत असून मुंबई महापालिकेने स्थायी समिती मध्ये याबाबत ठराव करून 3 महिने वीजबिल किमान 50 टक्के माफ करण्यासाठी निर्णय घ्यावा असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले आहे. याच धर्तीवर उर्वरीत महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेचे तीन महिन्याचे संपूर्ण लाईटबिल शासनाने माफ करण्यासंदर्भात महावितरण कंपनीला निर्देश द्यावे अशी मागणी वानखडे यांनी केली आहे.
    यासोबतच वीजबिल माफ करण्यासोबत कोरोना ची चाचणी मोफत करावी किंवा अल्प दरात करण्यात यावी. सध्या कोरोना चाचणी साठी 5 हजारापर्यंत दर आकारले जात आहेत. त्याऐवजी मोफत किंवा रु. 500 एव्हढया अल्पदरात कोरोना चाचणी करावी अशी ना. आठवले यांची मागणी असून याबाबत ते लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार आहेत. यासोबतच रुग्णालयातील डॉक्टरप्रमाणे नर्स यांनाही कोरोनाचे किट उपलब्ध करून दिले पाहिजे. पुरेश्या सुविधा नर्सेसलाही दिल्या पाहिजेत. तसेच खाजगी डॉक्टरांनी दवाखाने बंद करू नयेत. अशाही मागण्या तेजराव वानखडे यांनी केल्या आहेत.