Ticker

6/recent/ticker-posts

रस्त्यावर गर्दी  करणाऱ्यांची आता गय नाही;निर्बंध मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करणारच -अजित पवार

रस्त्यावर गर्दी  करणाऱ्यांची आता गय नाही;निर्बंध मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करणारच -अजित पवार
मुंबई दि.२३ मार्च - ‘कोरोना’ संसर्ग रोखण्यासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयाचं व घातलेल्या निर्बंधांचं उल्लंघन करणाऱ्या व रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही. रस्त्यावर अकारण दिसणाऱ्या आणि प्रवास करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करुन कठोर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.
दरम्यान गरज पडल्यास राज्यात संचारबंदीही लागू केली जाईल असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
घराबाहेर पडून रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांमुळे ‘कोरोना’ची साथ पसरण्याचा धोका वाढला आहे. रस्त्यावर गर्दी करणाऱ्या मोजक्या ‘निर्बुद्धां’मुळे राज्यातील जनतेच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. राज्य शासनाने आतापर्यंत संयमाने घेतले, परंतु हा संयम कायम ठेवणे यापुढे शक्य नाही. बंदी आदेशांचं उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करणारच असा इशाराही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.